स्वातंत्र्यदिनानिमित्त कलाकारांनी दिल्या शुभेच्छा !

भारत १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे. देशातील प्रत्येक नागरिक हा दिवस भव्यतेने आणि उत्साहाने साजरा करतो. झी मराठीच्या कलाकारांनी *स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील प्रगती बदल सांगितले आणि आपले देश प्रेम व्यक्त केल्या.*

*शिवा मालिकेतील शिवा म्हणजे पूर्वा कौशिक* – “सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताला आणखीन प्रगतीशील बनवण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे असं मला वाटत. जितकं लोक ज्ञान घेतील तितके पुढे जातील मग ते तांत्रिक ज्ञान, वाचन असो किंवा वेगळ्या प्रकारची विद्या आत्मसद करणे असो. भारतात शाळांमध्ये मला शिक्षण पद्धती आणखी सुधारलेली बघायला आवडेल. आज आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलत आहोत तर मला सांगायला आवडेल की मी फ्रीडम फायटर भगत सिंग यांच्यावर एक नाटक केलं होतं. मी नवीन पिढीला हेच सांगेन की नवीन गोष्ट आत्मसाद करणं सोडू नका. कारण आताची पिढी खूप फास्ट आहे. मला तितक जास्त ज्ञान नाही पण मला असं वाटत की इतक्या विशाल लोकसंख्येमध्ये आपण नवीन गोष्टी आत्मसाद करण्यात कमी पडतोय असं वाटतंय. एक बदल बघायला आवडेल तो म्हणजे शिक्षण पद्धती मध्ये, दुसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानता आपण हे फक्त म्हणतो पण ते प्रत्यक्षात दिसत नाही. आज ही आपल्याकडे बोललं जातं की आरे तो करतोय ना, तो करणारच, तू काय करतेस, तर असं न होता दोघांना सामान नजरेने पाहिले पाहिजे.”

*’अप्पी आमची कलेक्टर’ मधली अप्पी म्हणजेच शिवानी नाईक* , ” माझ्या लहानपणी स्वातंत्र्यदिन खूप गोड साजरा व्हायचा सकाळी शाळेत जाऊन आम्ही सर्वजण झेंडा वंदन करायचो. पण आता पुष्कळ बदल झालाय. काही लोक १५ ऑगस्ट एक सुट्टी म्हणून बघतात पण काही लोक आहेत जे स्वातंत्र्यदिनाचं महत्व समजून खरंच ह्या दिवशी देशासाठी काहीतरी चांगलं काम करतात. जग सध्या खूप पुढे चाललंय पण जर मला काही बदल घडवायचा असं सांगितलं तर किंवा कशात सुधारणा झालेली पाहायला आवडेल तर ते आहे जातिवाद. मला असं वाटतं की सगळे जण सामान आणि एकत्र राहून काय करता येऊ शकत ह्याच्या कडे लक्ष दिले तर गोष्टी खूप वेगळ्यारीतीने होतील आणि विचारांचा विकास होईल. पुढच्या पिढीला मी हाच सल्ला देईन की देशासाठी काहीतरी आपल्या पद्धतींनी करा. कारण आपल्यावर देश स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी नाहीये, पण जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते सांभाळणं आपली जबाबदारी आहे. त्याला सांभाळा, स्वच्छता ठेवा, शिस्तपाळा, एकजूट होऊन राहा जे तुमच्या हातात आहे त्या गोष्टी करा भारत देशाला पुढे नेण्यासाठी.”

*’पुन्हा कर्तव्य आहे’ मधला आकाश म्हणजे अक्षय म्हात्रे* ,” भारतात माझ्या डोळ्यासमोर मी जे बदल पाहिले आहेत ते म्हणजे इंफ्रास्टकचर मध्ये विकास. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या जवळ एकही मॉल नव्हता पण आता तीन मॉल आहेत, त्यासोबत मोठमोठे टावर, हायवे मध्ये विकास होताना पहिला आहे. मला जर आणखीन काही गोष्टींची प्रगती झालेली पाहायला आवडेल ते म्हणजे रोजगार आणि व्यवसाय विभागात. आपल्यादेशात व्यपार करणारे लोक अधिक वाढले पाहिजेत ज्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त मला सांगायला आवडेल की जेव्हा पासून सिनेमा पाहायला लागलो भगत सिंग आणि चंद्रशेखर आजाद ह्यांच्या व्यक्तिमत्वाने मला प्रेरणा दिली आहे. जर मला कधी संधी मिळाली तर ह्या भूमिका साकारायला आवडेल. पुढच्या पिढीला एकच सल्ला आहे की बदल घडवा, जागरूक राहा, जबाबदार रहा, मतदान करा, बदल घडण्याची वाट पाहू नका जबाबदारी घ्या आणि बदल घडवा.”

*’लाखात एक आमचा दादा’ ची तुळजा म्हणजेच* *दिशा परदेशी* , “मी भारतात डिजिटल क्रांती पहिली. लँडलाईन पासून हायटेक मोबाईल फोन्स, कम्प्युटर पासून ते लॅपटॉप, कॅश ते डिजिटल मनी ह्यासगळ्या गोष्टी पाहिल्यात. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेमुळे मला साताऱ्यातील एका छोट्या गावात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मला शेतीची आवड निर्माण झाली. भारताचा शेतीमध्ये विकास झाला आहे यात शंका नाही पण मला शेतीत अधिक प्रगती पाहायला आवडेल आणि माझ्यामते तरुण पिढीला या विषयावर शिक्षित केले पाहिजे ज्याने देशाची ही प्रगती होईल. मी अभिनय क्षेत्रात आहे तर जर मला कधी संधी मिळाली तर सुभाष चंद्र बोस ह्यांच्या सैन्यदलातील महिला सैनिक सरस्वती राजमानी ह्याची भूमिका साकारायला आवडेल. जेव्हा मी सुभाष चंद्र बोस ह्यांचे पुस्तक वाचत होते तेव्हा त्यांचा उल्लेख वारंवार होता आणि खूप कौतुक वाटलं मला. त्यांनी देशासाठी काय-काय केले आहे आणि एक महिलेने कशी क्रांती घडवली ते प्रेक्षकांनपर्यंत पोहचवायला आवडेल. पुढच्या पिढीला मी एकच सल्ला देईन की आपल्या संस्कृती परंपरांना जोडून हा देश पुढे नेला पाहिजे. नवीन गोष्टी तर शिकल्याच पाहिजेच पण आपल्या मुळांना विसरू नका. ”

*’नवरी मिळे हिटलरला’ ची लीला म्हणजे वल्लरी विराज* ” मला कळायला लागल्यापासून आपल्या देशात बदल पाहिले आहेत ते म्हणजे शाळा आणि शिक्षणपद्धती, हॉस्पिटल्स मेडिकल, इंफ्रास्टकचर मध्ये. हेच नाही तर आपल्या देशाच्या नागरिकांच्या विचारामध्ये ही प्रगती आली आहे. पण मला असं वाटत स्त्रियांना सामान वागणूक आणि स्वतंत्र मिळालंच पाहिजे मोट्या शहरात खूप प्रमाणात हे घडलंय पण अजूनही छोट्या शहरात आणि गावाकडे अजून त्यात तितकी प्रगती नाही. विचारांची क्रांती झाली की पूर्णपणे देश स्वतंत्र झालाय असे आपण म्हणू शकतो. पुढच्या पिढीला आणि सर्वानाच एकच सल्ला असेल की भारताचा इतिहास आणि ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलं त्यांना कधीच विसरू नका “

Leave a Reply